विचित्र आणि अस्वस्थ करणारा अनुभव आहे खरा!
मी अनेक पौर्णिमांना प्रवास केले आहेत... ते ही रात्रीचे.... कधी एकट्याने.... पौर्णिमा आणि अमावास्येला एक गूढतेचे वलय असते खरे! पण आजपर्यंत मला तरी पौर्णिमा किंवा अमावास्येच्या प्रवासात अनुचित, अपघाती अनुभव आलेले नाहीत. हां, विचित्र अनाकलनीय अनुभव जरूर आलेत.... आणि हो, त्या काळात वर्तमानपत्रातील अपघात, हत्या, खून, दरोडे, आत्महत्या इत्यादी बातम्यांमध्ये लक्षणीय वाढ जाणवली आहे!
पौर्णिमा-अमावास्येचा मानवी मनोवस्थेवर, निसर्गावरही परिणाम होतो. ह्या काळात मनोरुग्णांमधील अस्वस्थता वाढते, सामान्यांच्याही मनात भरती ओहोटीप्रमाणे भावना-विचार तरंग उमटतात... ह्याच काळात शारीरिक दृष्ट्या आजारी लोकांचे आजारही बळावताना दिसतात... चोरटे, दरोडेखोर अमावास्येचा फायदा घेऊन लुटालूट करण्याच्या योजना आखतात.... अमावास्येला अनेक ठिकाणी आजही वशाट, ओली पार्टी वगैरे बेत केल्यावर निष्काळजीपणे वाहन चालविणारे अपघाताला साक्षात निमंत्रण देतात.... पौर्णिमा-अमावास्येचे गमतीशीर अनुभव करेन शेअर हळूहळू