विनायकराव तुमची शंका रास्त आहे.
मी न. र. फाटक यांचे पुस्तक वाचले नाही. त्यात त्यांनी कोणते संदर्भ वापरले आहेत. आणि सावरकरांनी कोणते संदर्भ वापरले आहेत हे पडताळून पाहिले आणि मग अजून खोलात वाचन केले तर तुमच्या शंकेचे निश्चित समाधान होऊ शकेल असे वाटते.
डेव्ह बॅरीचे एक वाक्य आहे...
"अपघात प्रत्यक्ष बघितलेल्या दोन माणसांकडून त्या अपघाताचे वर्णन ऐकले तर (त्या दोन वर्णनातली तफावत बघून) इतिहासाबद्दल मनात निश्चितच शंका येते."
ह्या घटनांच्या वेळेस ना फाटक होते ना सावरकर. दोघांनीही तात्कालिक नोंदी आणि कागपत्रांवरून हे लिखाण केले आहे. दोन्ही बाजूने शंकेस वाव आहे. तसेच जे संदर्भ वापरले गेले त्यांच्या विश्वासार्हतेचा पण प्रश्न आहे. मला तरी, अधिक खोलात वाचन, हेच उत्तर दिसते.