ज्या देशातील लोक आपले सरकार घराणेशाहीच्या आधारावर निवडतात, भ्रष्ट नेतांच्या कारभाराकडे व भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून त्यांनाच पुन्हा निवडून देतात, मुलींना गर्भातच मारतात आणि संस्कार - परंपरांच्या नावाखाली अनिष्ट प्रथा जोपासतात त्या देशातील नागरिकांकडून डोळस, विज्ञाननिष्ठ व अंधश्रद्धामुक्त दृष्टीकोनाची अपेक्षा करणे फारच हास्यास्पद आहे असे नाही का वाटत तुम्हाला? आणि अश्या व्यवस्थेत तर मानसिक आधारासाठी मग लागतेच ना गरज कोणत्या न कोणत्या टेकूची.... 
आणि जर अश्या प्रकारे कोणा स्वामी-महाराजाच्या प्रभावाने लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळत असतील, त्यांच्या परीने उत्तम टाईमपास करत असतील, कायद्याची चौकट न ओलांडणारे वर्तन करत असतील तर त्यात प्रॉब्लेम काय आहे? जोपर्यंत ते त्यांचे काम व्यवस्थित करत आहेत, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत, कायद्याचे उल्लंघन न करता वागत आहेत तोवर इतरांनी काळजी करण्याचे कारणच काय? त्यांच्या घरच्यांनी म्हटले तर एकवेळ समजू शकते!