मुस्लिम जगत येथे हे वाचायला मिळाले:
पाकिस्तानने कधीही आतंकवादाचे समर्थन केले नसल्याचे पाकिस्तान सरकार व येथील मुल्ला- मौलवी सांगतात. भारतात अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हापासून पाकिस्तान ही दहशतवाद निर्यात करणारी भूमी असल्याचे चित्र तयार होत आहे. जिहाद शब्द तर पाकिस्तानची ओळख बनला आहे. पाकिस्तान सरकार या आरोपांचे वारंवार खंडन करत आहे व असे आरोप करणे चुकीचे असल्याचे सांगत आहे. मात्र पाकिस्तानचे वृत्तपत्र दै. डॉनने या सर्व आरोपांचा स्वीकार केला आहे आणि पाकिस्तान सरकार काहीही म्हणो, कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही असे संकेत आपल्या वृत्तपत्रीय मजकुरातून दिला ...