माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर! येथे हे वाचायला मिळाले:
न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार या अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे, अर्थात् भोपाळ गॅस दुर्घटनेबाबत मात्र ती लागू करता येणार नाही, कारण या दुर्घटनेला पंचवीस वर्षे होऊनही या दुर्घटनेतील बळींना अजूनही न्याय मिळालेला नाही! जगातल्या सर्वात भयानक अशा या औद्योगिक अपघातात अनेक निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले, अनेक जण अपंग झाले, एवढेच नव्हे तर या दुर्घटनेचे भयंकर परिणाम या दुर्घटनाग्रस्तांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनेही भोगले. मात्र असे असले तरी या खटल्यातील आरोपींना कठोर शिक्षा देऊन सरकार आपल्या जखमांवर फुंकर तरी घालेल अशी दुर्घटनेग्रस्तांची ...