पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालक आणि रिक्षाचालक-मालक संघटनांच्या दादागिरीपुढे येथील सर्वच राजकीय पक्ष, नेते, आरटीओ आणि वाहतूक पोलीस अधिकारी आणि राज्यस्तरावरील सर्वपक्षीय नेत्यांनी शेपूट घातले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे रिक्षांचे मीटर डाऊन झालेले नाही. मुठभर रिक्षाचालक हजारो प्रवाशांना वेठीस धरत आहेत. राज्य शासनानेही या प्रश्नात तातडीने लक्ष घातले नाही तर कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांच्या सहनशीलतेचा कधीही स्फोट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.