आमच्या शाळकरी वयात आमच्या आजोबांचे एक मित्र घरी यायचे. ते श्रीमंत घरात जन्माला आले होते. पण स्वतःच्या आळशीपणापायी व उधळपट्टीपायी त्यांनी सर्व इस्टेट घालवून टाकली व त्यांना आपल्या आठ मुलांसह अक्षरशः झोपडपट्टीत राहायची पाळी आली. तरी बोलण्याचालण्यातला ताठा कमी झाला नव्हता. एकदा आमच्या घरी आले तेव्हा बोलता बोलता स्वतःच्या छातीवर थाप मारून (आमच्यासमोरच) आमच्या वडलांना म्हणाले, "अरे, या बापूकाकानी अठरा पोरं छापली नि सत्तर हजारांचा चुना केलाय. आहेस कुठे? " त्यांचं हे 'कर्तृत्व' १९२०-३० च्या दशकातलं होतं.