ज्यावेळी आयुष्यात स्थैर्य येतं म्हणजे आता आपण मनाला वाटेल ते करू शकतो अशी परिस्थिती येते आणि तरीही काही तरी कमी आहे असं वाटतं तेंव्हा तुम्ही सत्याचा शोध सुरू करता. आपण स्वतःला मानत असलेली व्यक्ती आणि आपलं स्वरूप यातली न सांधली जाणारी दरी हे सगळ्या हुरहूरीचं मुख्य कारण आहे. जोपर्यंत आयुष्यात काही तरी व्ह्यायच आहे असं वाटत असत तेंव्हा ही हुरहूर त्या इच्छां खाली दबलेली असते. व्यक्तीमत्वातून मुक्त व्हा हुरहूर संपली!
तुम्ही घेतलेलं नांवच तुमची अभिलाषा दर्शवत. आपण खरोखरीच मुक्त जाणिव आहोत पण स्वतःला व्यक्ती म्हणून समजून जगत आहोत हे सगळ्या उद्विग्नतेचं एकमेव कारण आहे.
सध्या तुमचं मन तुम्हाला आणखी एक भूल घालतय की भूतकाळ किती छान होता पण त्या आठवणी आहेत त्यात रमून काही उपयोग नाही. तुम्ही व्यक्तीमत्वातून कसं मोकळं व्ह्यायच ते बघा. या संधीचा उपयोग करा, ही हुरहूरच तुम्हाला स्वतःप्रत पोहोचवेल!
संजय