उद्या जर भारतातल्या प्रत्येकाने ‘हे विश्वची माझे घर’ समजून स्वतःपुरता प्रश्न सोडवला, तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही! प्रश्न एका बाजूच्या दृष्टीकोनाचा नाही, तर दोन्ही बाजूंनी हे ‘विश्वची माझे घर’ हा दृष्टिकोन बाळगला तरच त्याचा काही उपयोग आहे. आज तुम्ही आणि मी या इथे मनोगतवर आपल्या भाषेत हक्काने चर्चा करु शकतोय ती ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना न बाळगता कोणीतरी आपले रक्षण करत आहे म्हणून, याकडे कृपया लक्ष द्यावे. आज वेळगावमधल्या लोकांना आपली गरज आहे, तेंव्हा आपण त्यांना आपापल्यापरिनं मदत ही करायलाच हवी. कारण आपल्यालाही अशी मदत कोणीतरी केली आहे, करत आहे.