जिथे मूळ गावाचे नाव स्थानिक संस्कृतीशी निगडित आणि अर्थपूर्ण असेल तेथे ते कितीही मोठे असेल तरी स्वीकारण्यास हरकत नाही. अहमदाबादपेक्षा कर्णावती, नालासोपारापेक्षा शूर्पारक असे ऐकायलाही छान वाटते. एदलाबादच्या जागी मुक्ताईनगर हा बदल आता रुळला आहे तसेच जुनी सुंदर नावे कालांतराने वापरात रुळतीलच. त्रिवेंद्रम नावाला काही अर्थ नव्हता. तिथे थिरुअनंतपुरम (थिरू = श्री) नावाने केरळी लोक सुखावले.

पण काही नावे गंमतीशीरही असतात. त्यांचे काय? महाबळेश्वरजवळ एका गावाचे नाव 'बोचेघोळ' आहे आणि बामणोलीवरून शिवसागरातून जाताना काठावर 'शेंबडी' नावाचेही एक गाव आहे. 'येडेमच्छिंद्र', 'शेटफळ', 'साप', 'गारगोटी' इथल्या ग्रामस्थांनी काय करावे? (कृपया हलकेच घ्या)