अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:
परवा पुन्हा एकदा मुंबई-पुणे प्रवास करावा लागला. सुट्टी सुरू होण्याचा अवकाश, की मुंबई -पुणे गाडया भरभरून वाहायला लागतात. आरक्षण एक तर मिळत नाही आणि चुकून मिळालेच तर त्याचा फारसा उपयोग होत नाही असा आजवरचा अनुभव! त्यामुळे गाडीत सुट्टी - गर्दी - आरक्षण – भ्रष्टाचार – रेल्वे - सरकार – लोकसंख्या या संदर्भात एक तरी चर्चासत्र नक्की असते. नियमित प्रवाशांच्या चेह-यावर ’हे असेच चालायचे’ असा स्थितप्रज्न्य भाव असतो किंवा ’ही गर्दी म्हणजे काहीच नाही’ असा अनुभवी आव असतो.