प्रिय कंदी,

नाराज होऊ नकोस, प्रशासक म्हणतायत तसा उल्लेख केला म्हणजे झालं!. मनोगतींना मूळ मुद्दा कळायला वेळ लागतो असा माझा वैयक्तीक अनुभव आहे आणि सहज मजा घ्यायची सोडून कशावर ही चर्चा सुरू होते, ते अजीबात मनावर घ्यायचं नाही.

मी तुला एक सोपं सूत्र सांगतो जर आपण मजेत असू आणि दुसऱ्याला दुखवायचा किंवा त्याचा गैरफायदा घ्यायचा आपला उद्देश नसेल (आणि इथे तर तो सरळ सरळ नाहीए) तर मग मजेत रहायला आणि जे आपल्याला आवडतं ते करायला काही हरकत नाही.

तू लिहीत रहा. आनंदात राहणं आणि जमेल तसा आनंद वाटत राहणं ही आपली स्टाईल आहे. लोक त्यांचं दुखः सोडायला तयार नसतील तर आपण काय करणार?

संजय