समीरजी... कुठल्याही कलाकाराला काय किंवा कवी, गझलकाराला जी कोणती उपाधी लागत असते, ती उपाधी त्याच्या असंख्य चाहत्यांनीच दिलेली असते. प्रत्यक्ष कलाकार किंवा कवी कडे त्याचं कर्तेपण जात नाही. भट साहेब हे मराठी गझलेचे अध्वर्यू होते हे आपल्याला कोणीही सांगायची गरज नाही. आज आपल्यासारखे चांगले कवी जेव्हा गझल लिहीतात, तेव्हा तो गझलेचा पिंड भटसाहेबांनीच मराठी माणसात आणि तुमच्यातही (तुमच्या नकळत!! ) रुजवलेला आहे हे आपण विसरू नका. गझलसम्राट हे पद भटसाहेबांना तमाम चाहत्यांनी दिलं आहे. तुम्ही केलेलं विधान मला थोडं असुरक्षिततेच्या भावनेतून आल्यासारखं वाटतं! तुमचे चाहते उद्या तुम्हाला गझलसम्राट म्हणू लागले (तशी माझी सदिछा आणि आपल्या चाहत्यांना विनंती देखील आहे!! ) तर मात्र आपणही भटसाहेबांप्रमाणे ती पदवी अत्यंतीक नम्रतेने नाकाराल ह्याची मला नक्कीच खात्री आहे, परंतु तेव्हा देखील आपण आपल्या चाहत्यांना शुभेच्छा 'जबाबदारी' ने द्यायला सांगाल का? मला वाटतं तुम्ही त्यांचा आदर राखाल.