स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करणारे जरी कलाकार नसले तरी चाहत्यांनी, अनुयायांनी उत्स्फुर्त प्रेमापोटी त्यांना पदव्या, उपाध्या दिलेल्या आहेत. कलाकार तर रसिकांच्या मनाशी निगडीत असतात. त्यांना प्रेमाने पदवी देऊन गौरवणे हे नुसतेच 'शक्य' नाही आहे तर ते होणारच!
समीर,
आपला पहिला प्रतिसाद (आता चर्चाप्रस्ताव) आक्रमकतेमुळे वेगळ्या दिशेला गेला होता असे मला वाटते.
प्रश्न कविता या क्षेत्रात 'सम्राट' ही पदवी असावी का असा (मला तरी वाटतो की) असायला हवा.
१. कवितेमध्ये विशिष्ट टारगेट नसल्यामुळे (जसे सलग सहा वेळा विंबल्डन जिंकले किंवा सत्तराव्या वर्षी हिंदी चित्रपटासाठी गीते गायली) कवितेत 'सम्राट' बनणे हे अशक्य आहे. अन्यथा ज्ञानेश्वरांना 'माउली'ऐवजी 'ओव्यांचे शहेनशहा' वगैरे म्हंटले गेले असते. एकमेवाद्वितीय, अद्वितीय, महान, श्रेष्ठ या स्वरुपाची विशेषणे योग्य ठरावीत असे पुन्हा लिहितो. सम्राटपद या शब्दातून बऱ्याचदा 'सत्ता असणे, लढून मिळवणे' असा फील येतो.
२. सुरेश भट यांच्या काव्याबद्दल कधीच काही निगेटिव्ह लिहिले जाऊ शकणार नाही असा ग्रह असणे, निर्माण करत राहणे (मला) अयोग्य वाटते. त्यांचे प्रकाशित काव्य पुस्तकाच्या दुकानात खरेदी करून वाचता येत असल्यामुळे त्यावर मतप्रदर्शन करायचा अधिकार कुणालाही आहे व हे त्यांनी स्वतःही म्हंटलेले आहे की रस्त्यावरच्या सामान्य माणसासाठी माझी कविता आहे. सामान्य किंवा असामान्य गझल रचू शकणारेच फक्त त्यावर बोलतील असे प्रत्यक्षात शक्य नाही. 'हे वसंताचे गटारी बारकावे' ही ओळ जर मला आवडली नाही तर घाबरून 'वा वा' वगैरे म्हणणार नाही. भटांचे प्रकाशित काव्य ही मराठी रसिकाची (योग्य अर्थाने, इतर काही अपेक्षित नाही) मालमत्ता आहे. आपण जेव्हा म्हणतो की 'अमिताभ' या या पिक्चरमध्ये फ्लॉप गेला तेव्हा आपण अभिनयाचे धडे घेऊन कर्तृत्व गाजवलेले असणे आवश्यक नाही.
मराठी गझलेचे भीष्म असे मी म्हणेन! कारण भीष्म महापराक्रमीही होते, सम्राटपदापासून स्वतःहून दूरही होते, सर्वात वरिष्ठही होते आणि अर्जुनाकडून पराजितही होऊ शकत होते. त्यात वास्तव आहे.
(संपादित : प्रशासक)