मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:
आपल्या समाजात जश्या पारंपारिक रूढी आहेत त्याप्रमाणेच काही समज पण आहेत...(खर तर गैरसमज म्हणल तरी चालेल की जे मला कधी झेपलेच नाही.).ज्यांना काहीच आधार नाही. आधार काय तो एवढाच की आपल्या वडील माणसांनी या समजांना मान्यता दिली आहे. (मोठ्यांनी मान्यता दिली म्हणल्यावर आपण काय बोलणार डोंबल??) या समजांविषयी खर तर मला खूप कुतुहुल आहे. हे अशे समज करून देण्यामागे काय कारण असु शकत. कोणाच्या सुपीक डोक्यातून हे सगळ बाहेर पडल आहे ते देव (देव काका नव्हे) जाणो.. आता अशेच काही समज पहा.