आपली शैली उत्तम आहे. तरीही सात भाग होऊनही कथानक किंचितही पुढे सरकलेले नाही. दूरदर्शनवर वर्षानुवर्षे चालणाऱ्या कंटाळवाण्या मराठी तसेच हिंदी मालिकांप्रमाणेच तुमची कथा चालणार असे दिसते. त्या मालिकांसारखाच आपलाही भर प्रामुख्याने विवावबाह्य संबंधांवर दिसतो.
दुसरे असे वाटते (चुकीचे असल्यास आधीच माफी मागून ठेवतो) की कथेमध्ये नेमके काय सांगायचे आहे त्याची रूपरेषा आपल्याजवळ तयार नाही. एक भाग झाल्यावर पुढच्या भागात काय लिहायचे यावर विचार करून (मेकिंग अप ऍज यू गो अलाँग) ८-१५ दिवसांनी नवीन भाग लिहिता.
परखड मत व्यक्त करत आहे याबद्दल क्षमस्व.
विनायक