आयुष्याच्या वाटेवरती

आयुष्याच्या वाटेवरती कुणीच कुणाच नसतं.
सगळीकडे भटकत जाणार मन आपलस असतं.
आयुष्याचा महासागर पोहून पार करत असताना,
आपल मन खुप धडपड करत असत.
मरणाच्या वेळी मात्र एकाकी पडत असतं.
खरच आयुष्य म्हणजे दुसर काही नसतं,
तर पाण्याबाहेर आलेल्या माशाची जगण्यासाठी चाललेली धडपड असतं.
आयुष्याच्या वाटेवरती आपल मन गाडीच्या चाकाप्रमाने कधी वर तर कधी खाली होत असतं.
आयुष्याचा डोंगर चढत असताना, दु:खाना, संकटाना सामोर जाव लागतं.
आयुष्य म्हणजे स्वतःला न उमजलेल एक कोड असतं.
त्याला सोडायचा प्रयत्न केला की ते आणखी गुंतागुंतीच होवून जातं.
त्याच्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न केला की ते आपली पाठ सोडत नसतं.
आयुष्य हे कळीतून आलेल्या फुलाप्रमाने असतं.
आयुष्य म्हणजे स्वला:ला मिळालेल एक वरदान असतं.
दुखा:शिवाय आणि सुखा शिवाय आयुष्य जगण अशक्य असतं.
                जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)