राजेश,
तुमचे रसग्रहण आवडले. त्यावर टीका होण्याची, त्यास विरोध होण्याची किंवा ते अनुल्लेखाने मारले जाण्याची प्रबळ शक्यता असली तरी अशा प्रकारच्या समीक्षेची गरज आहे. मराठी संकेतस्थळांवर
- आस्वादाच्या सोवळ्या, शब्दार्थी मर्यादा ओलांडाण्यास नकार
- रूपकांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करून त्यांना आपापल्या श्रद्धास्थानांवर हल्ला मानणे
- मानवी जीवनातील अत्यंत शक्तिशाली व अटळ प्रवृत्तींपैकी एक असलेल्या र्लैंगिकतेच्या ओझरत्या वास्तव दर्शनानेही "अश्लील"ची उठणारी ओरड, व मुरडली जाणारी नाके, व साहित्यात त्याच्या पडणार्या प्रतिबिंबास विरोध (द्वयर्थी विनोदांचे मात्र स्वागत)
- साहित्यात आयुष्यातील केवळ सत्यम्, शिवम्, सुंदरम्चेच व सकारात्मक चित्रण व्हावे व इतर पैलू/रंग दिसू नयेत ही व्यक्त/अव्यक्त अपेक्षा
अशा वारंवार दिसून येणार्या झापडबंदतेत अशा प्रकारची परीक्षणे निश्चित स्वागतार्ह व गरजेची आहेत. पुढील भागांच्या प्रतीक्षेत,
मिलिंद फणसे