स्पष्ट करून सांगितल्याबद्दल धन्यवाद. आस्वादाचा एक दृष्टिकोन कळला.
वर मिलिंदजींनीं म्हटलेले
- रूपकांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करून त्यांना आपापल्या श्रद्धास्थानांवर हल्ला मानणे
हें पटलें.
- मानवी
जीवनातील अत्यंत शक्तिशाली व अटळ प्रवृत्तींपैकी एक असलेल्या
र्लैंगिकतेच्या ओझरत्या वास्तव दर्शनानेही "अश्लील"ची उठणारी ओरड, व
मुरडली जाणारी नाके, व साहित्यात त्याच्या पडणार्या प्रतिबिंबास विरोध (द्वयर्थी विनोदांचे मात्र स्वागत)
- साहित्यात
आयुष्यातील केवळ सत्यम्, शिवम्, सुंदरम्चेच व सकारात्मक चित्रण व्हावे
व इतर पैलू/रंग दिसू नयेत ही व्यक्त/अव्यक्त अपेक्षा
हें मात्र सरसकट पटण्यासारखें नाहीं. बहुसंख्य म्हटलें तर ठीक पण बरेच उदारमतवादी असतात. त्यांना विसरणें हें कृतघ्नपणा ठरेल. डॉ. लागूंना आगरकर पुरस्कार मिळाला आहेच.
सुधीर कांदळकर