मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:
कुलाचार,कुलधर्म,कुलदैवत या सर्व प्रकारांशी लग्नापुर्वी दुर दुर पर्यंत संबंध नव्हता.गुरुवारी "स्वामी समर्थ मठ" सोडला तर बाकी इतर कोणत्याच ठिकाणी मी काही फ़िरकत नाही.आइ बाबा जातात म्हणुन प्रत्येक नवरात्रात निमगिरी ला आमच्या कुलदेवीला जायचो.ते पण मला तो परीसर खुप आवडतो म्हणुन अन सर्वात महत्वाच म्हणजे घरचे सर्व जण एकत्र असतात त्यामुळे मस्त मजा येते.तुळजापुर, जेजुरी इथे लहानपणी कधी तरी गेल्याच आठवतय.