एकदम मान्य पण कंटेंट गवसलेला हवा नाहीतर तो वाचकाला मध्येच कुठेतरी सोडून त्याची निराशा करतो, आणि हे जीवना विषयी लिहीतांना फार मोलाचं ठरतं असं मला वाटतं.
ग्रेस सारख्या कवीची अभिव्यक्ती निव्वळ सौंदर्यपूर्ण असते त्यात अर्थ नाही समजला तरी मजा येते
हे झरे चंद्र सजणाचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडात पुन्हा उगवाया
हे वाचूनच मन मोहरतं, अर्थ समजला नाही तरी हरकत नसते पण तुम्ही निवडलेली कविता वाचकाला अर्थाप्रत घेऊन जाण्याचं बंधन घेऊन येते आणि त्यामुळे ती एकाच कंटेंटची वेगळी मांडणी असली तरी कंटेंट गवसला असणं महत्त्वाचं ठरतं .
तुमचं रसग्रहण आवडलं. शुभेच्छा!
संजय