मला कळलेला अर्थ (आणि आमिरलाही) की जे आपण करत आहो, त्याची (त्या प्रोसेसची) मजा घ्या. मग शेवटचं फळ काय आहे, (किंवा असेल) यावर म्हणजेच साध्यावर आपला आनंद अवलंबून राहणार नाही.
मलेरिया झालेल्या परीक्षार्थीला गुण कमी पडले तरी त्याला मराठीची एखादी कविता किंवा भूमितीचे प्रमेय (हे जरा कठीण आहे ) शिकताना जो आनंद झाला असेल, तो कमी नाही होवू शकत.
आणि असेच कर्म करा ज्यात आपल्याला आनंद मिळतो.... उगाच वेगळ्या साध्याच्या मागे (उदा. जिथे पैसा जास्त आहे असे) लागून (व्यर्थ) प्रयत्न करून काहीच हाती लागले नाही म्हणून कष्टी होवू नये.