सूर्य, तारे, माणसं, नद्या, समुद्र, पशु-पक्षी, आकाश आणि या सर्वांना एकत्र बांधणारा आणि चालवणारा नियम सगळं मिळून जे एक आहे त्याला अस्तित्व म्हणणं योग्य होईल कारण हे चालवणारी कुणी व्यक्ती नाही, ते आपोआप चाललं आहे. त्यामुळे देव हे तुमचं आणि अस्तित्वाचं वैयक्तिक अफेअर होतं आणि तो भ्रम आहे. अस्तित्व निर्वैयक्तिक आहे आणि तेच खरं तर रहस्य आहे. ज्ञानी या रहस्याशी कृतज्ञ होतो आणि त्याला जे होईल ते मंजूर असतं कारण कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं, पुढच्या क्षणी पृथ्वी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणकक्षे बाहेर जाऊ शकते, तुम्ही कुणाला काय विचारणार आणि काय प्रार्थना करणार? 

देव ही अज्ञानी माणसानी स्वतःच्या समाधानासाठी निर्माण केलेली कल्पना आहे त्याला वाटतं की आपल्या प्रार्थनेमुळे आपलं भलं होईल, आपल्या मनासारखं होईल, ही अनिश्चितता दूर होईल. पण तुमची प्रार्थना कोण एकणार? आणि अशा अनेक जणांच्या अनेक प्रार्थना आहेत इतक्या भानगडीतून कोण निवड करणार?

तुम्ही या सगळ्या कल्पना दूर करा. काहीही झालं तरी आपल्याला फक्त कळतं होत काही नाही हा एक बोध सगळं जीवन बदलेल. तुम्हाला जे कर्म कराल त्यात आनंद वाटायला लागेल. तुम्ही वर्तमानात असे रमाल की भविष्यकाळ व्यर्थ होईल आणि फलाकांक्षेचा प्रश्नच रहाणार नाही आणि श्लोकाचा अर्थ लावण्याची गरज वाटणार नाही.

संजय