टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
तरूण , तडफदार सत्वशील राजाच्या राज्यावर परचक्र येते. शेजारी असलेला सम्राट दगा-फटका करून त्याला बंदी बनवतो. जेता सम्राट सत्वशीलाला ठारच मारणार असतो पण त्याच्या आदर्शवादाची छाप त्याच्यावर पडतेच ! तो त्याला एक वर्षाच्या आत, एका जटील प्रश्नाचे उत्तर शोधायला सांगतो व त्या बदल्यात त्याला अभय देवू करतो. अर्थात प्रश्नाचे उत्तर एका वर्षात न देता आल्यास मृत्यूदंड अटळ असतोच ! असतो तरी काय तो जटील प्रश्न ? बायकांना नक्की हवे तरी काय असते ?