जुन्या पत्रस्मृती जाग्या झाल्या! मी अशीच खूप खरीखुरी आणि काल्पनिक पत्रे लिहिली आहेत! पोस्टकार्डावरची बहुतेक पत्रे जायची टपालातून, आणि वहीच्या किंवा पाठकोऱ्या कागदावर लिहिलेली पत्रे नंतर रद्दीत जायची! शिवाय आईच्या पर्स, पिशवीत तसेच बाबांच्या बॅगेत, दाराआडच्या डकवलेल्या शबनम पिशवीत माझी कोणाकोणाला लिहिलेली अनेक पत्रे सापडायची सगळ्यांना!