अमराठी माणसे मराठीत बोलल्यावर आपण का हुरळून जातो तेच कळत नाही.  मराठी माणसांच्यात हा न्युनगंड बहुदा राजकारण्यांमुळे निर्माण झाला असावा.  मराठीच काय पण जगातील कोणतीही भाषा इतर भाषिक जनता इतिहासकाळा पासून बोलत आली आहे, हयाची असंख्य उदाहरणे सापडतात.  कितीतरी मराठी माणसे गुजराती, बंगाली, कानडी इ. भाषा अस्सखलीतपणे बोलतात पण त्याचे कुणी कौतुक करताना आढळत नाहीत, इतर भाषिकांना तर या गोष्टीचे काहीच सोयरसुतक नसते आणि तेच योग्य आहे असे मला वाटते. कारण कोणताही माणूस इतर भाषेत बोलतो ते गरज म्हणून किंवा आवड म्हणून किंवा सहवासामुळे.