खरं तर मी एका लग्नात गेलो होतो, तिथे दुसऱ्या एका मुलीच्या लग्नाचे फोटो मी बघितले अन तिचा नवरा काही खास नाही असे म्हटले, त्यावर माझ्या मित्राने नंतर ही गोष्ट सांगितली.
पश्चात्ताप ! खरं सांगायचं तर नाही झाला. गेलेल्या गोष्टींचा विचार न करणे, हे बहुदा शनीमुळे जन्मजातच भिनले असावे
त्यावेळी माझ्यामागे लागणाऱ्या (कदाचित मनातूनच का होईना) बऱ्याच मुली होत्या, पण माझ्या (त्यावेळच्या) तिखट स्वभावामुळे मला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सांगणे त्यांना जमले नाही. त्यात माझा स्वभाव म्हणजे सरळ आणि थेट (स्ट्रेटफॉरवर्ड) असल्याने, जी मुलगी 'मी प्रेम करते' हे सांगू शकत नाही, ती जीवनभर साथ काय देणार? ' असं माझं मत होतं. जे (प्रेम) चुकीचे नाही ते लपून का करावे ?
त्यामुळेच कदाचित मला चांगली बायको मिळाली असेल.
अवांतर आणि अधिक महत्त्वाचे :- तुमची सीनिअर, वर्षा मॅडम, मग तुमचीच बॅचमेट अनुजा मॅडम, मग श्रद्धा.... आणि नंतर.... जाऊ द्या... तिकडे त्या पोरी एकमेकींशी तुमच्यावरून भांडत होत्या, अन तुम्ही श्रॉडिंजर अन आईन्स्टाईनचं भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते.... "
ह्या माझ्या मित्राने मला सुनावलेल्या एका वाक्यावर ही कथा लिहिली आहे. बाकी प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा 'त्या' मुलिशी काहिही संबंध नाही. अर्थातच नावेही.