अध्यात्म हे कर्म-ज्ञान-भक्तीने युक्त तीन पेडी लक्ष्य आहे. या विषयी हजारो वर्षांपासून चिंतन केले आहे ते अनेक अतुल प्रतिभावंतांनी. त्यातून निघालेले नवनीत ज्यांना जसे गोड लागते, ते तसे स्वीकारत असतात. संन्यस्त होऊन व्यक्तीगत पातळीवर ते स्वीकारायचे कां समाजात राहून समष्टी पातळीवर त्याचा अंगीकार करायचा, हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा निर्णय असतो. श्रीमद्भगद्गीता अध्यात्माचा विचार साकल्याने मांडते यातच तिचा गौरव आहे. सत्य हे चिरंतन सत्यच असते. असत्याचे अस्तित्व अल्पकालीन ठरणारे असते, हा सामान्य अनुभव आहेच.
हरिभक्तजी, तुमचेही विचार वाचायला नक्कीच आवडतील.