संवाद वगळता बोलीभाषेचा वापर करू नये असे माझे मत आहे. हल्ली कथाच नाही तर अगदी वैचारिक लेख लिहितानाही लोक करायचं, दिसतंय वगैरे शब्दयोजना करतात तेव्हा ते वाचताना मला दुखते. गौरी देशपांडेंच्या कादंबऱ्यांत तुम्हाला संवादाव्यतिरिक्त कुठेही बोलीभाषेचा वापर दिसणार नाही, पण त्याने वाचताना कुठेही बाधा येते असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे दीप्तीताई कथा लिहिताना बोलीभाषेचा वापर करत नाहीत ह्याचा मला आनंद वाटला. मला बोलीभाषेची उणीव भासली नाही.
कथा तशी चांगली आहे. आर्किटेक्चर शिकलेला तो आर्किटेक्ट. त्यामुळे आर्किटेक्ट राजवाडे असे असायला हवे, आर्किटेक्ट राजवाडे (आर्किटेक्चर राजवाडे नव्हे), आर्किटेक्टकडे (आक्रिटेक्चर्कडे नव्हे) जायला सुचवले, असे हवे. असो