एवढे साक्षात्कारी माणस असतांना मला साक्षात्कार काय होणार कपाळ! विनोदाचा भाग सोडला तर ...

  1. मन चक्षू द्वारे आत्म्याला परमात्म्याचे झालेले दर्शन म्हणजे साक्षात्कार होय. कोणाला मुर्ती दिसते, कोणाला चित्र रुपात दिसतो, तर कोणाला लख्ख प्रकाश दिसतो ह्यालाच कोणी नुर ए ईलाही म्हणत कोणी दिव्य प्रकाश असे हि म्हणत.
  2. साक्षात्कार झाला की मी पण गळून पडत, कारण मी माझा न राहता तो सर्वस्वी त्याचाच होतो. जे जे कार्य हि व्यक्ती करते ती फक्त त्याच्या ईच्छेसाठी करते. जिवनात जे साध्य करायला माणूस येतो ते साध्य झाले असल्यामुळे त्याच्या ईच्छेचा ( वासनेचा) लोप झालेला असतो त्यामुळे कोणाकडून काहीच अपेक्षा राहत नाही . सर्व शक्तीमान परमेश्वरच त्याचे जिवन चालवत असतो म्हणूनच तो त्याच्या साठीच आणि त्याच्या ईच्छेनुसार जगत असतो.
  3. आपणास साक्षात्कार होऊ शकत नाही कारण आपल मी पण संपलेल नसत. आपल्या मुलांशी , आई - वडीलांशी बोलतांना सुद्धा आपला मी जिवंतच असतो ह्याचे उदा. आपण पावलो पावली घेतच असतो. साधी चर्चा असते पण त्याच्यात सुद्धा आपल मी पण शाबूत असतचना , म्हणजेच काय आपण एका विशिष्ट नावाने जगत असतो तोच आपला मी असतो, आणि जोपर्यंत मी मरत नाही तो पर्यंत तो दिसत नाही.
  4. स्वामी रामकृष्ण आपल्या मठात काली मातेच्या ध्यानात बसले होते . आता ध्यान म्हणजे खाता, पिता, उठता, बसता, झोपता, खोकता तिचाच (ईष्ट देवतेचा) ध्यास करणे ह्यालाच ध्यान म्हणतात, आणि ध्यानाच्या पुढची पायरी म्हणजे समाधी. तर असो... तर स्वामी जगदंबेच्या चिंतनात बसले असतांना तेथे एक माणुस आला आणि म्हणाला " स्वामीजी आपल्या मार्गदर्शनाखाली मला पण अंबा भेटेल का? " "हो!  काही नाही ? " स्वामी ताडकन बोलले. " मग मी अस काय करू की मला जगदंबेच दर्शन लगेचच होईल? " माणसाने विचारले . "काही नाही तुझ्या अंगावरचे सर्व वस्त्र उतरव त्याची वळचणी करून डोक्यावर घे आणि ह्या प्रांगणात तिच्या नावाने ५ फेऱ्या मार ". "अस कधी होत का "म्हणत तो माणुस तीथून निघून गेला. आता सांगा त्याला साक्षात्कार कसा होणार कारण एक तर त्याचा आपल्या पेक्षा अधिकारी माणसावर विश्वास नाही. आणि मला कोणी पाहिल तर काय म्हणेल हे मी पण शिल्लकच . त्यामुळे मी पण लयास जात नाही तो पर्यंत साक्षात्कार हा होतच नाही.
  5. साक्षात्कार झाल्यावर माणसात थोड मीत्व शील्लक असत, म्हणुनच समाधी हि त्याच्या पुढची पायरी असे म्हणतात.