मनाच्या 'विचार शुन्य' अवस्थे विषयी.
अनुभव नसल्याने अशी शंका येते..
विचारशुन्य अवस्था एखाद्या निरोगी व्यक्तीला खरोखर साध्य आहे का?
आपल्याला होणारी अंतःप्रेरणा सुद्धा एक वेगळ्या पातळीवरचा 'विचार' च असतो. फक्त तो एवढा भरभर होतो, की तो शब्दबद्ध होत नाही. सर्व साधारणपणे विचार हे शब्दात होतात, आणि ते फार वेळखाऊ काम आहे. अत्यंत अटीतटीच्या वेळी अशी अंतःप्रेरणाच कामास येते, कारण तेवढाच वेळ असतो. पण माणसाने आपले जगणे एवढे समृद्ध/किचकट करून ठेवले आहे की केवळ अंतःप्रेरणेने केलेले विचार जगरहाटी चालवण्यास पुरत नाहीत, म्हणून आपण भाषा वापरून विचार करत बसतो.
तर विचारशुन्य अवस्था खरोखर शक्य आहे का?
विचारशुन्य अवस्था यदाकदाचीत साधलीच, तर ते समजेल का? कारण 'समजण्यात' कुठेतरी मेंदुचा वापर होणारच.
कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है ... कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है
के क्यों ... कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है!