पैसा इतका महत्त्वाचा का आहे याचं कारण पैशाशिवाय काही पानच हालत नाही ना. ओशोंनी तरी काय केलं. पैसाच जमवला ना? लोक आणून देत असतील तर त्यांनी नाही कशाला म्हणायचे? जमा झालेला पैसा त्यांनी गोरगरीबांच्याकल्याणासाठी वापरला का? मानवी मनावर पैशाचा पगडा राहणारच कारण पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. रोजच्या कमीत कमी गरजा भागवण्यासाठी तरी पैसा पाहिजेच ना? घेणाऱ्याइतका देणाऱ्याला आनंद होवू शकतो ना, ते मानवी वृत्तीवर अवलंबून राहील. माणूस मूलतः स्वार्थी असल्याने असे फार कमी घडते. एखाद्याचा स्वभाव, त्याची वृत्ती त्याच्या गुणसूत्रांमुळे, आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, शिक्षणामुळे, एखाद्या कटू किंवा चांगल्या घटनेमुळे, अशा अनेक बाबींमुळे बनत किंवा बदलत असतात. कोणाला पैसा महत्त्वाचा वाटतो, कोणाला वाटत नाही. कोणाच्या वाटण्या---न वाटण्याने पैशाचे महत्त्व कमी होत नाही. बाकी काही नसले तर एक वेळ माणूस वेळ मारून नेईल पण पैसा नसला तर काहीच करता येत नाही आणि पैशाचे सोंगही आणता येत नाही.