जगण्यासाठी पैसा आणि पैशासाठी जीवन - हे सामान्य माणसासाठी  जीवनाचे सूत्र आहे. 'सर्वे गुणाःकांचनमाश्रयंते ', हा जीवनात येणारा हरघडीचा वास्तवातला अनुभव !"मी निष्कांचन-निर्धन साधक, हिमालयाचा मी तो यात्रिक" - अशी वृत्ती अंगी आल्यावर पैशाचा मोह कमी होण्याची शक्यता वाटते .ह्या हाताने (मोल- वस्तु वा पैसा )द्या व त्या हाताने (मोबदला वा गरजेची साधने) घ्या, ही 'कल्पने'ची वस्तुस्थिती कालामानानुसार बदलत आलेली असावी. पैशाशिवाय आयुष्य कल्पनेतही अशक्य , हे मान्य करावेच लागेल. आवश्यकतेपेक्षा जास्त पैशाच्या मागे लागणे, हे मोह आणि उपभोगाच्या काही अंशी अवास्तव गरजे पोटी ! माणसाला जीवन 'सावकार-भिकार' यातच घालवावे लागत आहे आणि निर्मोही साधु-संत बनणे हे प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळे आपण म्हणता तसा आनंद पैसा-स्थावर-जंगम-वाटणी-विषमतेत तरी मिळणे अवघड आहे.