१) ह्यात काही शंकाच नाही. सकाळी उठून दात घासायला पेस्ट लागते ती पैसे देऊनच विकत घ्यावी लागते त्यामुळे दिवसाची सुरुवात पैशाशिवाय होऊ नाही शकत. दिशा बदलणे व्यक्तिसापेक्ष आहे.
२)म्हणतात सगळ्या गोष्टींच आणता येतं पैशाच नाही.
३) समाजातली तुमची पत-प्रतिष्ठा पैसा ठरवत असतो.
काल आम्ही सगळ्या मैत्रीणींचा एकत्र जेवणाचा कार्यक्रम होता. त्यातली क्ष ज्योतिष्य-भविष्य, वास्तुशास्त्र व खड्यांवार विश्वास ठेवणारी. तिच्या बोटातल्या अंगठ्यांच्या वाढलेल्या संखेबद्दल विचारले असता तिला आलेली प्रचीती-अनुभव सांगत होती. तिने वास्तुशास्त्राप्रमाणे बदल केले व त्यांची मिळकत तिप्पट झाली. आता ही मिळकत टिकवण्यासाठी अंगठ्या. आता पुढची पाच हजाराची पुजा केली की मिळकत अजून वाढणार आहे (आधीच्या तीन हजाराच्या पुजा होत्या) मी तिला हेच विचारले हे सगळ्ळ तुम्ही फक्त पैशासाठीच करता का? हो, कारण आज सगळं विकत मिळत ते पैशानीच. मला मुलींना शिकवायच आहे ते पैशाशिवाय होऊ नाही शकत (मुलगी ढ आहे) मुलींची लग्नं करायची आहेत (मुली दिसायला बेताच्या आहेत पैसा आल्यामुळे सतत बाहेरच्या खाण्यामुळे जाड झाल्या आहेत). पण मला असे वाटते की मुलींना सक्षम बनवावे. विकत डिग्र्या मिळतील, नोकरी मिळेल पण ती टिकेल किती दिवस? त्यांना कतृत्ववान बनवावे. त्यांचे कतृव बघून मुलं लग्नाला तयार होतील. पुढे अजून ती घालणाऱ्या पुजेची किंमत किती वाढत जाणार आहे हे तीच जाणो. एक दत्ताकाकांशी सुखसंवाद वाचत होते. त्यात त्यांनी म्हटलंय माझ्याजवळ भरपुर पैसा आहे म्हणावं, मिळकत दहाहजार असेल तर खर्च आठच ठेवावा अर्थात पांघरुण पाहून पाय पसरावे. पण आजकाल सगळ्यांना पाय पसरवून द्यायचे असतात पांघरुण वाढवायचे असते. असो. तुर्तास एवढेच.