साधी गोष्ट आहे ... जे अधिक अधिक पैसा मिळवतात ते अधिक अधिक संसाधनांवर मालकी प्रस्थापित करतात, क्षमता असल्यामुळे आपले जीवन्मान उंचावतात, खूप खरेदी करतात. म्हणून मग महगाई वाढत जाते, मग नाइलाजाने इतरांना सुद्धा अधिक महागाईत तग धरून राहण्यासाठी अधिक पैसा मिळवणे आवश्यक बनून जाते.उदाहरणार्थ, खाजगी अभियांत्रिकी कॉलेजेस च्या फीज १९८७ च्या सुमारास वार्षिक ७-८०००/- रू. च्या आसपास होत्या. जसजशी विद्यार्थ्यांच्या पालकांची अधिकाधिक फी भरण्याची तयारी दिसू लागली तसतशा फीज एकदम कुठल्या कुठे पोहोचल्या. आता मला जर माझ्या मुलासाठी अभियाण्त्रिकीचा पर्याय उपलब्ध ठेवावयाचा असेल तर मला त्या प्रमाणात पैसा मिअळवून ठेवावाच लागणार ना?