प्रस्तुत पुस्तक जरी मी वाचलेले नसले तरीही ज्या प्रकारचे स्तंभलेखन राजू परुळेकर करतात, त्यावरून त्यांच्याकडून प्रामाणिक लेखनाची अपेक्षा ठेवता येत नाही. महाराष्ट्राचे दुर्दैव यात आहे की ज्या माणसाने (उद्धव ठाकरे) २००५ पासून शेतकऱ्यांकरिता सतत आंदोलने केली. संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र पिंजून काढला, हजारो पीडित शेतकऱ्यांना दिलासा दिला त्या कार्याची फारशी दखलही घेतली जात नाही. यात महाराष्ट्राचे अधिक नुकसान आहे. राज्याला गरज आहे ती शांत, संयमी, मुत्सद्दी, दूरदर्शी व जाती-निरपेक्ष विचार करणाऱ्या नेत्याची व हे गूण उद्धवमध्ये नक्कीच आहेत. वरील उदाहरणांमध्येही माणसांना जोडलेच जात होते.

याउलट सवंग प्रसिद्धीसाठी हिंसक व भडकावू व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या चमको नेत्यांची अवाजवी स्तुती प्रस्तुत पुस्तकाचे लेखक आपल्या स्तंभामधून वकिली करत असतात.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली यापलीकडेही महाराष्ट्र आहे तो अधिक समृद्ध कसा करता येईल यावर समाज-धुरिणांनी व विचारवंतांनी अधिक लक्ष दिल्यास या राज्याला गतवैभव नक्कीच मिळवून देता येईल.