हा सारा राजकारण्यांचा गाढवगोंधळ, लोकांचे लक्ष अतिमहत्वाच्या प्रश्नांवरून इतरत्र वळविण्यासाठी. आपल्यासमोर किती प्रश्न आहेत हे सांगायला पाहिजे का ?  सारे समाजजीवन पोखरून टाकलेला भ्रष्टाचार, सर्व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, त्यातील भेसळ, देशाबाहेरील व आतील शत्रू, गरीब व श्रीमंत यातील अस्मान व पाताळ एवढी दरी, प्रश्न, समस्या तरी किती अनंत, अथांग. हे सारे लोकांनी विसरावे यासाठी तर हा सारा उद्योग. साऱ्यांना सोडा सुशिक्षितांना, विचारी माणसांना तरी कधी कळेल का ? कळेल तो सुदिन. आणि हेच जर बघायचे तर काय पाडून काय बांधले हे जर खरेच इतिहासात बघितले तर धक्कादायक उत्तरे मिळतील. जाता जाता - एक नवीन साइट - साऱ्यांनी जरूर पाहावी - प्रबोधनकार.कॉम