काही महिन्यांपूर्वीच राहुल गांधी यांनी बिहारमध्ये जाऊन २६/११ हल्ल्यांबाबत विधान करून समग्र महाराष्ट्राचा अपमान केला. "मुंबईला वाचवायला उ. प्र. व बिहार चे जवान लागले". जसे काही आजवर महाराष्ट्रातील सैनिकांनी देशरक्षणासाठी काहीच केले नाही. अन त्या हल्ल्याच्या वेळीही मुंबई पोलिसांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा अपमान माझ्या पाहण्यात तरी कुणीच केला नव्हता.
त्या वेळी उद्दाम राहुल ला खुले आव्हान उद्धव यांनीच दिले. खरे कर्तव्य तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे होते की राहुल ला जाहीरपणे खडे बोल सुनवावे. म. न. से. प्रमुखांनी केवळ काही बायकी टोमणे मारले.
तुम्हीच सांगा महाराष्ट्राच्या सन्मानासाठी नेमका कोणता सिक्का त्यावेळी चमकला? कुणी डायरेक्ट ऍक्शन घेतली? (सरळ वार केला?)