समजा तुम्ही गेल्या १०-१२ वर्षांपासून एक मोठी जबाबदारी पार पाडत आहात. अन अचानक कुणीतरी तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधीत काही मुद्दे व अर्धवट माहिती एकत्र करून पाहिजे तसे आरोप करेल व तुमच्या महत्त्वाच्या कामगिरीचा उल्लेखही केला नाही तर तुम्हाला कसे वाटेल?

गेल्या ११ वर्षापासून महाराष्ट्र राज्य बरेच भोगत आहे कारण आघाडी सरकारच्या दिशाहीन व धोरणहीन कामगिरी. ४ वर्षांनंतर जर काही चांगला बदल हवा असेल तर नीतिन गडकरी व उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हा समर्पक पर्याय आहे असे माझे ठाम मत आहे. व ते त्या दोघांच्या कार्यावरून बनले आहे.

या धाग्यावरील इतर प्रतिसाद अश्या प्रकारचे आहेत की परप्रांतांतून येणाऱ्या लोंढ्याचा प्रश्न हा म. न. से. ने पूर्णपणे सोडविलेला आहे. प्रत्यक्षात तो सुटला तर नाहीच परंतु अधिक जटिल बनलाय.

शेवटी राज्याच्या व्यापक हिताचे काय हे बघायला हवे अथवा बिमारू राज्यांमध्ये आपणही गणले जाउ.