तुम्हाला उत्तम समज असेल तर एका क्षणात सगळे प्रश्न संपतील (नाही संपले तर हेच उत्तर परत-परत पूर्ण आत्मसात होईपर्यंत वाचा):
ज्याला वेळ समजते तो वेळेच्या बाहेर असला पाहिजे, ज्याला काल समजतो तो अकाल असला पाहिजे. तुम्हाला जर भविष्यकाळ आणि भूतकाळ समजतात तर तुम्ही कालातीत असला पाहिजे, तुमच्यावर कालाचा परिणाम होत नसला पाहिजे.
नीट बघा : बालपण होतं, तारूण्य होतं आणि आता वार्धक्य आहे पण हे ज्याला कळतंय तो जसाच्या तसा आहे. हा बोध इतका खोल न्या की कुणी काहीही म्हणो तुम्हाला वय जाणवलं नाही पाहिजे; म्हणजे तुम्ही सरळ सिंहगड एकादमात चढू शकणार नाही पण शरीर आणि आपण या दरम्यान एक न सांधला जाणारा बोध निर्माण होईल. मग शरीर थकलंय हे तुम्हाला कळेल पण ज्याला कळतंय तो थकणार नाही. ही अध्यात्मिक साधना आहे आणि यावर चर्चा होऊ शकत नाही कारण ज्याला बोध झाला त्याला पुराव्याची गरज नाही आणि ज्याला बोध नाही त्यानी कितीही वाद घातला तरी त्याला ते समजणार नाही.
मग तुम्ही शरीराची काळजी घ्याल पण शरीराला काही झालं तर भीती वाटणार नाही, आता शरीराला भूक लागली तरी आपण स्वतःलाच भूक लागली असं समजतो इतकी जबरदस्त एकरूपता झाली आहे.
अधिक माहिती साठी माझा 'या निशा सर्व भूतानां' हा लेख वाचा.
संजय