रंगा, शुद्ध मराठी यांनी बरोबर म्हटले....कोणी म्हटलं यापेक्षा जे म्हटलं त्यावर भाष्य केलंत तर बरं होईल !
त्या लोकांचे दिन मुंबईत साजरे करायची अवदसा कुणाला आणि का सुचली ? काँग्रेस काय कमी लाड पुरवत होती का या लोकांचे ?
उद्धवच्या आंदोलनामुळे कर्जमाफी झाली हे समजणे म्हणजे भोळेपणाचे ठरेल....
उद्धवची कुठलीही मुलाखत घ्या, तुम्हाला त्यात काहीही मुद्देसूद सापडणार नाही... निदान उत्साहदायक, इन्स्पिरेशनल असेही काही आढळत नाही......
राज यांच्या बोलण्यात एक धडाडी आहे, कडवा असला तरी एक कणखर मार्ग आहे..... विशेष म्हणजे त्यांचा कुठलाही मुद्दा संपूर्णपणे नाकारता येत नाही किंबहुना बऱ्याच अंशी पटण्यासारखा असतो.
तुम्ही म्हणता उद्धव इतके दिवस विधायक काम करतो आहे, काय आहे ते विधायक काम ? सांगा तरी !
मुंबईवरून काही महिन्यांपूर्वी राजकारण पेटले असताना, राज यांनी इंग्रजी माध्यमांना मराठीतून मुलाखती दिल्या व त्या प्रसारित करायल्या लावल्या ! भारताया इतिहासात याच्या पूर्वी पूर्ण देशाने एका तरी मराठी नेत्याकडून इतके मराठी ऐकले आहे ? कुण्या नेत्याने ते धाडस दाखवले ? याच वेळी उद्ध्व आपल्या मोडक्या हिंदीत ओशाळभूतपणे सर्व मुलाखती देत होते !
काही तमिळ आमदार, खासदार तर लोकसभेत, विधानसभेत तमिळ भाषांतर नसलं तर भवन डोक्यावर घेतात आणि बाकी सर्व ते खपवून घेतात, राज यांनी प्रथमच इतर भाषिक नेत्यांना मराठीची दखल घेण्यास भाग पाडलं !
मीमराठी ने म्हटल्याप्रमाणे.... राजमुळेच मराठी पाट्या पहायला मिळतात !
मुंबईत राहणाऱ्या आणि विशेषतः उपनगरात राहणाऱ्या माझ्यासारख्या तरुणाला राज का भावतात हे इकडे राहिल्याशिवाय कळणार नाही ! दादर, माहीम येथे राहून परप्रांतियांची झळ कधीही कळणार नाही (आणि ते चांगलच आहे, खुष रहो!) पण इकडे काय परिस्थिती आहे ते अंधेरी आणि पुढच्या उपनगरांतील मराठी माणसाला विचारा....!
असो तुम्ही गडकरींना मानता यात समाधान आहे ! तो माणूस अभ्यासू आहे, नॉलेजेबल आहे, काही एक आदर्श बाळगणारा आहे.....
पण उद्धव यांच्या नेतृत्वात सारवासारव, दिशाहीनता, मुद्दे टंचाई, अविधायकता, केयरलेसनेस जाणवतो !