महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी वातावरण चांगलेच तापले होते आणि लोक खरे तर सत्ताबदल घडवण्याच्या मनस्थितीत होते. उद्धवने शेतकऱ्यांच्या मेळाव्यांमधून प्रभावी वातावरण निर्मिती केली होती. पण शेवटच्या दहा-बारा दिवसांत उद्धव केवळ राजच्या मागे लागला आणि दोघांच्या कलगी-तुऱ्यामुळे मतदार गोंधळले. उद्धवच्या रेंजमध्ये सापडू नये म्हणून गायब झालेले अनेक नेते या संधीमुळे खूश झाले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. उद्धवने राजकडे दुर्लक्ष करून राज्यातील समस्यांचा मुद्दा लावून धरला असता तर एव्हाना शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर दिसले असते.
निष्णात फोटोग्राफरचा फोकस चुकला, एवढेच म्हणावे लागेल.