उद्धवचे सोकॉल्ड विधायक काम तरी सांगा ? मुंबईत राहून मला तरी उद्धवचा प्रभाव कधिही जाणवला नाही ! तुम्ही म्हणता तसं त्यांनी निवडणुकीच्या काळात त्यांनी पूर्ण राज्यात दौरा केला हेच फक्त जर त्यांचे विधायक काम असेल तर कठीण आहे !
मी तरी जेवढं आठवलं तेवढ लिहिलं ! पुस्तकात अजून बरेच मुद्दे असे आहेत की खरचं कळंत की राजने शिवसेना का सोडली !
राजचे काम -
१. मराठीच्या प्रश्नाला किंमत मिळेनाशी होत असताना तो मुद्दा असा काही उचलून धरला की पूर्ण देशाला या प्रश्नाविषयी जाग आली ! इंडियन एक्सप्रेस मध्ये एका तमिळ लेखकाने राजच्या भुमिकेचं समर्थन केलं - तो म्हणाला "मी इतकी वर्ष मुंबईत राहून मला मराठी येत नाही पण हे चेन्नईत कधिही खपवून घेतले जाणार नाही..... मराठी लोकांनी ही संधी वाया घालवू नये !"
२. राज्यात राजने दिलेल्या अल्टिमेटम नंतर मराठी पाट्या लागल्या !
(पूर्वी त्या इंग्रजी, गुजराथी, कन्नड, तमिळ, तेलगु, पंजाबी, नेपाळी ?!! मध्ये असत - निदान मुंबईत तरी)
३. मुंबईत अनेक ठिकाणी लागणारे बिहारी (अत्यंत सवंग) चित्रपट कमी झाले - हे उपनगरात तर फार झाले होते - ते
चित्रपट आमच्याच नगरात (मराठी ऐवजी) लागलेले बघताना (मुंबई उपनगरात) आमचे
मोराल कसे आणि किती डाऊन होत असेल याची कल्पना करून बघा !
राजच्या आंदोलनानंतर जागोजागी त्यांचे पोस्टर्स, त्यांचे ते "हम है सजना तोहार" टाईप चित्रपट लागणे कमी झाले - परिणामतः सांस्कृतिक प्रदुषण कमी झाले !
४. नाशिक मध्ये नगरपालिकेच्या रस्त्यावर प्रचंड अतिक्रमण असूनही सर्व अधिकाऱ्यांनी हात टेकलेले असताना राज यांच्या पाठपुराव्यामुळे ते सर्व अतिक्रमण हटले ! (असे अनेक ठिकाणी होवो)
५. मीमराठी ने सांगितल्याप्रमाणे जेट एयरवेज चा मुद्दा !
६. नेहमी असे दिसून आले आहे की एखादा फार जुन्या व न सुटलेल्या गुंत्यावर राजने उत्तर शोधायला सुरूवात केली की मग उद्ध्वला जाग येते व मग तो म्हणतो की हे तर शिवसेनेचंच काम आहे.... अरे ते जर तुमचंच होतं तर आतापर्यंत का झालं नाही ? राजने त्या प्रश्नाला हात घातला की मगच का ह्यांना जाग येते ?
७. राजने मिडियाचा नेहमी आदर केला आहे ! त्याच्या पक्षाने कधिही मिडियावर हल्ला केला नाही - शिवसेनेने पत्रकारांवर हल्ले केले व पुढे त्याचे ते समर्थनही करतात ! (आयबीएन)
८. काही मुद्दे नाहीत म्हणून शिवसेना चित्रपटांना टार्गेट करतात (संगनमताने) व नसलेले मुद्दे उखडून वातावरण तापवतात ! (माय नेम इज खान)
उलट खरोखरीच काही आक्षेपार्ह असेल (मराठीचा अपमान) तर राज त्या चित्रपटकर्त्यांना योग्य त समज देऊन माफी मागायला लावतो (वेक अप सिद)
९. राजने कधिही धर्मावर आधारित भुमिका घेतलेली नाही - उलट मराठी मुस्लिमांबद्दल त्याला प्रेम आहे - बरेच मराठी मुस्लिम राजला मनसेस्थापननेनंतर भेटून गेले. ही केवढी आश्वासक बाब आहे !
असो.... ज्याचे त्याचे मत ! मी काही मनसेचा प्रवक्ता नाही - राजने केलेली सोनिया गांधीची नक्कल मला सवंग, अयोग्य व अकारण वाटली.
मला या गोष्टीचा धक्का बसला आहे की मुंबईचा मराठी शिक्का पुसण्यामागे तिच्यावर हक्क सांगणाऱ्यांचाच डाव आहे ! हे फार हर्टफुल आहे मुंबईकरासाठी !
एका अर्थी ते पटतंही - कारण शिवसेनेसारख्या पक्षाच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या सहकार्याशिवाय परप्रांतियांकडे राजधानी निसटणे शक्य नाही !