आपण बहुधा माझा प्रतिसाद नीट वाचला नसावा. मी असे लिहिले की काही मुद्दे योगायोगाने त्यात आलेले आहेत.

राहिला प्रश्न धाग्यातील ९ मुद्द्यांचा, तर अतिशय स्पष्टपणे त्यावर अगोदरच्या प्रतिसादांत लिहिले आहे. मुळात ९ पैकी ७ हे गंभीर मुद्देच नाहीत. शिवसेनेने देशाविरुद्ध काम करणाऱ्या जिहादी लोकांना जवळ केलेले नव्हते तर आपल्याच देशातील नागरिकांना जवळ केले होते. अन हे कितीतरी मराठी नागरिकांमध्ये अजिबात आक्षेपार्ह नाही.

अन मुळात त्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न १९९५-९६ पासून सुरू झाले होते. उत्तर भारतात अनेक शाखा स्थापन करून बऱ्याच निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले होते. २००० सालच्या बिहार विधानसभा निवडणूकीत मनोहर जोशींनी अनेक सभा घेतल्या होत्या.  अन हे धोरण बाळासाहेबांच्या व राज सेनेत पूर्णपणे सक्रिय असताना ठरवण्यात आले होते. त्या राज्यात पक्षाचा प्रसार करायचा असेल तर महाराष्ट्रात राहणाऱ्या तेथील नागरिकांना जोडणे हे ओघाने आलेच. राज यांनी सेना डिसेंबर २००५ मध्ये सोडली. म्हणजे शिवसेनेने इतकी वर्षे राबवलेल्या धोरणात राज यांचाही वाटा असणारच. अन या मुद्द्यासाठी उद्धवना दोष देण्यापेक्षा सरळ बाळासाहेबांवर आरोप करावेत व त्या धोरणात असलेल्या स्वतःच्या सहभागाची जबाबदारी स्वीकारावी.