पुण्य  , पाप, सुख , दुःख, चांगलं , वाईट, खरं खोटं, आनंद वगैरे या सर्व भावना व्यक्तिगत
आहेत. त्या व्यक्तिपरत्वे बदलतात. स्वार्थ, निः स्वार्थ या भावनाहीबदलतात. आपलं वागणं सुखाचं व्हावं ही धडपड असायला हवी.
बहुतेक वेळा माणसं लोकांच्या मतांनुसार जगताना आढळतात. स्वतःला काय वाटतं हा विचार करीत नाहीत. त्यामुळे तथाकथित
स्वार्थी लोकांना शिक्षा व्हावी असं वाटलं तरी मरेपर्यंत ती व्यवस्थित जगताना आढळतात. कदाचित ती स्वतःचा विचार करून जगत असतील
जे आवश्यक आहे, म्हणून त्यांना शिक्षा होत नाही. पण घाबरून चांगलं वागणंही वाईट नाही. ज्यामुळे इतरांना जगता येतं. दुसऱ्याला
त्रास देण्याची ताकद असूनही जो त्रास देत नाही तो खरा माणूस असं वाटतं. कित्येक वाईट वागणाऱ्यांचं काहीही वाईट होताना दिसत नाही.
असो. आपले जसे संस्कार झालेले असतात तशी माणसं वागत असतात, ते चांगलं की  वाईट याला काही अर्थ नाही. समाज कार्य, बांधिलकी
हे फार मोठे शब्द आहेत. प्रत्यक्षात मदत मागितली की काढता पाय घेणारेच जास्त. न दिसणाऱ्या देवापुढे लाखो रुपये टाकणाऱ्याकडे
जर मदत मागितली तर त्याला हाकलून दिलं जातं, तरीही तो समाजाची बांधिलकी जपतो म्हणन प्रसिद्धिस येतो. हे आश्चर्य आहे. यावर
लिहावं तितकं थोडं आहे.