ओळखले जात होते.

कविवर्य टिळकांचे काव्य आणि चरित्र वाचल्यानंतर जाणवते ते एकच की, खरोखरच हा एक
सत्पुरुष होता! आपल्या हळुवार कवितेत करुणेला गुंफणारा सत्पुरुष!

अगदीं खरें.
मला रे. टिळक जे कांहीं ठाऊक आहेत ते स्मृतीचित्रांमधूनच. त्यांनीं दया आणि हौशी या दोन अस्पृश्य मुलींना आपल्या घरीं आश्रय दिला होता.बालकवीही त्यांच्या घरीं अनेक दिवस होते. 'माझ्या आयुष्यांतले सर्वांत आनंदाचे दिवस हे टिळकांच्याघरचे' असे उद्गार बालकवींनीं केव्हांतरी काढल्याचें कुठेंतरी वाचल्याचेंही आठवतें.  असें असले तरी हिदू धर्मांतील स्पृश्यास्पृश्यता त्यांना डांचत होती म्हणून त्यांनीं ख्रिस्ती धर्म जेव्हां स्वीकारला तेव्हां ख्रिस्ती लोकांनीं कोपर्निकस, गॅअलिलीओ आदी शास्त्रज्ञांचा जो छळ केला तो त्यांना डांचला नाहीं याबद्दल एक आकस मात्र मनांत कुठेंतरी राहून गेला.

असो. मालिकेतला आणखी एक हान लेख.

सुधीर कांदळकर