माझ्या मते विवाह हे भारतीय संस्कृतीचं मानवी जीवनाला सगळ्यात महत्त्वाचं देणं आहे. सुरळीत समाज, अनौरस मुलांचे प्रश्न, मुलांचं संगोपन आणि व्यक्तिगत बांधीलकी हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे पैलू आहेत.

इंडियन पिनल कोडमधे  इलिसिट को - हॅबीटेशन (अवैध सहजीवन) हा गुन्हा आहे असं मला वाचल्याचं आठवतंय (आणि खरं तर तसं असायला हवं कारण ते तर्कसंगत आहे) पण मी हा लेख लिहितांना जेव्हा परत आय. पी‌. सी. बघीतला तेव्हा मला तो संदर्भ मिळू शकला नाही, शिवाय सध्या भारतात झालेल्या या विषयावरच्या जोरदार चर्चेत आय. पी. सी. चा उल्लेख नाही म्हणून मी त्यावर वेळ घालवला नाही.

इथे मला एक फार महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते, प्रॉस्टिट्यूशन आय. पी. सी. नुसार बेकायदा नाही कारण ती समाजाची गरज असू शकते, एका दृष्टीनं समाजव्यवस्था (खरं तर कुटुंबव्यवस्था) टिकावी म्हणून प्रॉस्टिट्यूशन (स्त्री काय किंवा पुरुष काय) गरजेचं आहे  आणि तो फक्त गरजे पुरता व्यवहार आहे, पण अविवाहित सहजीवन (खुद्द 'सकाळ' नी २२/१० ला ही बातमी देताना 'रखेल' असा शब्द वापरला आहे) सामाजिक हिताचं असू शकत नाही कारण ते तो पुरुष, त्याचं कुटुंब, ती स्त्री आणि झालीचं तर त्यांची अपत्य कुणाच्याच हिताचं नाही. 

 माझा स्वतःचा उद्देश भारतीय विवाहसंस्था टिकावी , लोकांना वैध सहजीवनाची मजा कळावी आणि अवैध सहजीवनाचा (आता असं म्हणणं जरी कायद्याला धरून नसलं तरी) फोलपणा कळावा असा आहे, कारण एखादी गोष्ट केवळ बेकायदेशीर नाही म्हणून ती तुमच्या हिताची ठरते असं नाही.

संजय