१) अस्तित्व ही सुरूवतीपासून या क्षणापर्यंत एकच प्रक्रिया आहे, म्हणजे तुमचे आई-वडील नसते तर तुम्ही आज नसता, त्यांचे आई-वडील नसते तर तुमचे आई-वडील तुमच्या पूर्वी नसते... असं करत पार ऍडम आणि इव्ह पर्यंत प्रत्येक गोष्ट नेता येईल आणि मजा म्हणजे तरी कोडं सुटणार नाही कारण मग ऍडम आणि इव्ह कसे आले हा प्रश्न अनुत्तरीत राहिल!

त्यामुळे अस्तित्वाच्या सलग प्रक्रियेचं तुम्ही व्यक्तिगत दृष्टीकोनातून विभाजन केलं तर 'फलला' अर्थ येतो नाही तर नाही.

२) याला दुसरा एक अँगल आहे, अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे फक्त एकच वेळ उरते ती म्हणजे वर्तमान, 'हा क्षण', मग तुम्ही संपूर्ण समग्रतेनं, मागे आपण यश मिळवलं की अपयश आणि या कर्मातून यशस्विता मिळेल की नाही असा विचार न करता जे करता आहात त्याचीच मजा घेऊ शकता, सिंपल! हा खरा कर्मयोग आहे.

संजय