मी त्यांना कागदपत्रके जमा केल्याचे स्थळ, काळ, वेळ इत्यादी सर्व बारिकसारिक तपशील दिले पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. इतकेच नाही तर मी कागदपत्रके जमा केले तिथला फोन नंबर शोधून काढून त्यांना जाब विचारून झाले. पण व्यर्थ.
विशेष म्हणजे, मी डायलर टोन सेवा वापरायचो परत परत डायलर टोन बदलायचो, तसेच महिन्यातून दोन तीन वेळा रिचार्ज सुद्धा करायचो, एस एम एस पॅकेज नियमीतपणे घ्यायचो. थोडक्यात, त्यांना फायदेशीर असा मी कस्टमर आहे.
पण कोण जाणे, असे का होत आहे ते?