तुम्ही माझी सगळी लेखमाला वाचा मग तुम्हाला व्यक्तिमत्त्व कसं तयार होतं ते कळेल
आपण मनाला आपण निराकार आहोत असं पटवत नाही, आपण निराकार आहोतच आणि ते आपल्याला माहिती आहे (म्हणून तर स्वच्छंदाची ओढ आहे!); मन आपल्याला आपण व्यक्ती आहोत असं पटवतंय आणि आपण राजी झालो आहोत!
लॉजिकच निर्णयाला वेळं लावतं स्वछंद नाही आणि सर्व लॉजिकल निर्णय संसदेतल्या निर्णया सारखे असतात केंव्हा बहुमत बदलेल काही सांगता येत नाही
जोपर्यंत आपण स्वच्छंद जगत नाही तोपर्यंत भीती वाटते आणि असं झालं तर काय तसं झालं तर काय असं वाटत राहतं पण ते केवळ विचार असतात
भीती घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे मनाकडे दुर्लक्ष करणं आहे!
स्वच्छंद ही व्यक्तिगत उपलब्धी आहे म्हणजे मला स्वच्छंद गवसला म्हणून माझ्या मुलाला तो मिळेल असं नाही त्याला व्यक्तिगत धाडसंच करावं लागेल मी फक्त त्याला तू धाडस कर असं सांगू शकतो. माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर धाडस तुम्हाला करावं लागेल.
संजय